पीकविमा योजना २०२५-२६: एक रुपयाचा विमा बंद, आता भरावे लागनार एवढे पैसे ?
शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपयात पीक विमा भरणे हि दिलासादायक गोष्ट होती, मात्र, आता राज्य सरकारने २०२५-२६ या वर्षासाठी सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन योजनेनुसार, शेतकऱ्यांना आता एक रुपया भरून पीक विमा काढता येणार नाही. त्याऐवजी, त्यांना त्यांच्या पिकाच्या प्रकारानुसार आणि विमा हप्त्याच्या दरानुसार ठराविक रक्कम भरावी लागणार आहे.
पीकविमा योजना २०२५-२६ ; एक रुपयाचा पीक विमा आता बंद
पूर्वी शेतकऱ्यांकडून फक्त एक रुपया घेऊन पीक विमा योजनेचा लाभ दिला जात होता. परंतु, सुधारित योजनेत हा नियम बदलण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या पीक आणि क्षेत्राच्या प्रीमियमनुसार ठराविक रक्कम भरावी लागेल. याचा अर्थ असा की, तुम्हाला तुमच्या शेतीत पेरलेल्या पिकासाठी लागू असलेला प्रीमियम आणि तुमच्या क्षेत्राचा विचार करून विमा हप्त्याचा ठराविक हिस्सा भरावा लागेल.
पीक विम्यासाठी उपलब्ध कंपन्या
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एकूण नऊ विमा कंपन्या उपलब्ध असतील, ज्यांच्या माध्यमातून शेतकरी पीक विमा काढू शकतात. या कंपन्यांमध्ये खालील कंपन्यांचा समावेश आहे
🔷भारतीय कृषी विमा कंपनी
🔷ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी
🔷HDFC ग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी
🔷ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी
🔷युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी
🔷युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी
🔷चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी
🔷रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी
🔷SBI जनरल इन्शुरन्स कंपनी
पीकविमा योजना ; शेतकऱ्यांना भरावी लागणारी रक्कम
नवीन सुधारित योजनेत, शेतकऱ्याला पीक विमा हप्त्याचा काही भाग स्वतः भरावा लागणार आहे. हा हिस्सा पिकाच्या प्रकारानुसार निश्चित केला आहे:
खरीप पिकांसाठी: एकूण प्रीमियमच्या २% (दोन टक्के)
रब्बी पिकांसाठी: एकूण प्रीमियमच्या १.५% (दीड टक्के)
नगदी (व्यावसायिक) पिकांसाठी: एकूण प्रीमियमच्या ५% (पाच टक्के)
या व्यतिरिक्त, उर्वरित प्रीमियमची रक्कम केंद्र आणि राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे, विमा भरताना शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रानुसार आणि पिकानुसार काही प्रमाणात पैसे भरावे लागतील.
पीक विम्यासाठी नुकसानीचे निकष
ही योजना पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्त्यांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी लागू असेल. यात खालील प्रमुख बाबींचा समावेश होतो:
वीज कोसळणे
गारपीट
वादळ
चक्रीवादळ
नैसर्गिक आग
पूर
भूस्खलन
अतिवृष्टी
दुष्काळ
पावसातील खंड (दीर्घकाळ पाऊस नसणे)
कीड व रोग
या सुधारित पीक विमा योजनेत, पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसानीचे निकष असतील. म्हणजेच, वर उल्लेख केलेल्या आपत्त्यांमुळे झालेल्या नुकसानीसाठीच विमा संरक्षण मिळेल.
सुधारित पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करावा?
पीक विमा अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच आहे. शेतकरी खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून अर्ज करू शकतात:
केंद्र शासनाच्या पीक विमा पोर्टलवर (ऑनलाइन)
सुविधा केंद्रांच्या (CSC केंद्रांच्या) माध्यमातून
बँकांच्या माध्यमातून
या बदलांमुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी आता थोडी जास्त रक्कम भरावी लागणार असली तरी, नैसर्गिक आपत्त्यांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण अजूनही उपलब्ध राहील.