सोयाबीन लागवड नियोजन ; सोयाबीन पिकाचे उत्पन्न कमी येण्याची कारण
सोयाबीन लागवड नियोजन ; गेल्या दोन ते तीन वर्षापासून सोयाबीन पीक घेण्याचा कल शेतकऱ्यांचा वाढत आहे. मागील दोन वर्षापासून सोयाबीन पिकाला चांगला बाजार भावही मिळत आहे. जसे बाजार भाव जास्त मिळत आहे तसे उत्पन्न कमी मिळत चालले आहे.सोयाबीन पीक पाहिले तर कमी कष्टाचे पीक म्हणता येईल, एकदा पेरणी करून दिल्यानंतर काढणीसाठी फक्त मजुरांची गरज लागते. त्यामुळे अनेक शेतकरी सोयाबीन पिकाची पेरणी करत असतात.पण सोयाबीन चे येणारे उत्पन्न, पिकावरती होणारा खर्च, आणि मिळणारा बाजार भाव, हे सर्व पहाता सोयाबीन पीक न परवडणारे पीक होत चालले आहे.
सोयाबीनचे उत्पन्न कमी येण्याची अनेक कारणे आहेत. आपला शेतकरी मित्र हा पारंपारिक पद्धती मध्ये गुंडाळून बसला आहे. पारंपारिक पद्धतीपेक्षा आधुनिकतेकडे आपण थोडे जरी वळलो तरी त्याचा फायदा आपल्याला दिसून येईल. आधुनिकतेकडे वळत असताना पारंपारिक कला मात्र विसरून जाता कामा नये.
सोयाबीन लागवड नियोजन सोयाबीनचे उत्पन्न कमी येण्याची कारणे
१) योग्य अंतर ठेवून सोयाबीनची पेरणी / टोकण न करणे.
२) योग्य खत व्यवस्थापन न करणे.
३) योग्य वाणाची निवड न करणे.
४) बीजप्रक्रिया न करणे.
५) जमिनीची मशागत व्यवस्थित न करणे.
६) रासायनिक खताचा अतिरिक्त वापर करणे.
७) आळी नियंत्रण वेळेवर न करणे.
८) वेळेवर सोयाबीन काढणी न करणे.
९) तण नियंत्रण न ठेवणे.
१०) वेळेवर पेरणी न करणे.
या सर्व कारणांमुळे सोयाबीनचे उत्पन्न कमी येत आहे.सोयाबीनचे चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी जास्त कष्ट किंवा जास्त भांडवल गुंतवावे लागेल असंही काही नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी विचार विनिमय करून सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन करावे. सोयाबीनचे चांगले उत्पन्न येण्यासाठी योग्य अंतरावर पेरणी करावी. अधिका-अधिक उत्पन्न येण्यासाठी टोकन पद्धतीचा अवलंब करावा. जमिनीमध्ये रासायनिक खतांऐवजी शेणखताचा वापर करावा. जास्त उत्पन्न देणाऱ्या वाणांची निवड करावी. तन नियंत्रण वेळेवर करावे.आणि सोयाबीन पिकासाठी दोनदा कीटकनाशकाची फवारणी घ्यावी, पीक फुल अवस्थेत असताना एकदा व शेंग अवस्थेत असताना एकदा. या सर्व बाबींचा जरी आपण विचार केला तरी देखील आपले उत्पन्न वाढायला मदत होईल.