Nuksan bharpai ; या जिल्ह्यांची नुकसान भरपाई मंजूर, पहा सविस्तर

Nuksan bharpai ; या जिल्ह्यांची नुकसान भरपाई मंजूर, पहा सविस्त

मे २०२४ आणि जुलै ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण मदत मंजूर केली आहे. या संदर्भात १६ जुलै २०२५ रोजी एक शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. हि मदत कोणत्या जिल्ह्यासाठी मिळनार आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळनार आहे सविस्तर पाहू..

Nuksan bharpai ; या जिल्ह्यांची नुकसान भरपाई मंजूर, पहा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ४९ लाख ६ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मे २०२४ मधील गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या २,७४८ शेतकऱ्यांचा समावेश आहे, ज्यांचे ९७६.६७ हेक्टर फळबागा आणि शेतीत पिकांचे नुकसान झाले होते.

सांगली जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या १८,३३६ शेतकऱ्यांसाठी ६ कोटी २९ लाख ५८ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

तसेच, याच कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील १,५५१ शेतकऱ्यांना २ कोटी ५ लाख रुपयांची मदत दिली जानार आहे.

या मदतीचे वितरण थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT पोर्टलद्वारे केले जाईल. भरपाईचे दर १ जानेवारी २०२४ च्या सरकारी निर्णयानुसार ठरवले जातील, ज्यामध्ये जिरायती, बागायती आणि फळपिकांसाठीचे दर समाविष्ट आहेत. प्रत्येक लाभार्थ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंतच मदत मिळेल. हा शासन निर्णय maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Leave a Comment